गुलमोहरांच्या आपल्या त्या
कावळ्या चिमण्यांच्या
ओट्यावर.
काल तु म्हणालीस ‘वाट बघ’
आता आपलं कसं म्हणून
पुस्तकांची पानं उचकत
आतल्या आत गोठून गेलो
एका पानावर,
मोगर्याच्या वेलीशी,
फांदी सोडून घेतेय
आपले हात.
दारातून दिसतेय मला,
आयुष्याचा हिशेब
बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी,
आणि हळद लावून बसलेली
भेदरलेली नवरी.
शहरापासून मरणा अगोदर
कोण पोहोचतो, म्हणुन.
भूके कंगालांचे तांडे
सरकताहेत हळू हळू
गावांकडे.
सगळीच तीर्थस्थाने,
महापुरुष आठवून
कोणीच येत नाही डोळ्यासमोर,
हडबडून, गडबडून,
घामाने चिंब होऊन.
टीटवीचा आवाजही देह
चिरुन जातो.
आपलं ठरलंय,
विना आणाभाकांचं.
तुला मी आणि
मला तू जपायचं.
तुझा जिव्हाळा, अबोला
धपापणारा श्वास,
अन एक खोल हुंदका.
सखे,
आत्ता तू जशी असशील
तशी ये.
मरणाची भिती दाटून गेलीय.
आज..
कुठले हे वळण,
आपलेच आपण
दूर..दूर राहण्याचे……!
Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 29 मार्च, 2020
वळण
Posted in कविता
प्रतिक्रिया व्यक्त करा