आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल. मा.पंतप्रधान मोदी यांच्या एका मॉर्निंग वॉकचा व्हीडीयो पाहण्याता आला आणि आनंदाला पारावर उरला नाही. इतका मोठा माणूस, इतका व्याप, पण सकाळच्या प्रसन्न वातावरणात, निसर्ग सौंदर्यात त्या वॉकचा काय अवर्णनीय आनंद असेल. बॅग्राऊंडला मस्त संगीत असावं, आजूबाजूला मोर-लांडोर असावेत, त्यांच्यासोबत केलेल्या वॉकचे मजा काही औरच.

भोर भयो, बिन शोर
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूर श्याम सुहाना
मनमोहक, मोर निराला.
सकाळ आपली नेहमीची झुंजमुंज होऊन नव्या नवरीसारखी नटून तयार झालेली असते, कोणताच आवाज न होता चोरपावलानी तिचा वावर सुरु होतो. तेव्हाच, मोर भयो, बिन शोर. मन अगदी मोर झाले आहे. भयो म्हणजे, झालं, होणे. मन विभोर झालं आहे. सावळा कृष्ण सुंदर नेहमीच सर्वाना आवडतो, आपला पांडुरंगही तसाच त्याचं मनमोहक रुप अगदी मनमोराचं वाटावं इतकं सुंदर असतं. तसाच मोर. मयुर. तितकाच मनमोहक आहे, खरं तर राष्ट्रीय पक्षी मोर, तो आपला पिसारा फूलवतो ते दृश्य अतिशय सुंदर असे होते. अशा मोरांबरोबर जेव्हा सकाल होत असेल तर तेव्हा सर्व समस्या, मनातील विचार दूर होऊन, मनाला प्रसन्नता लाभत असेल. मन उत्साही राहण्यासाठी काही उत्साहवर्धक गोष्टी हव्या असतात. मला मोरोपंताच्या श्लोककेकावलिची आठवण होते. मन गलबलून टाकणारी करुणार्त भावना अत्यंत उत्कटपणे यावे तसा तो आर्त सूर आणि प्रसन्नता त्यात दिसते. व्याकूळता आहेच, श्वास खोल आणि खोलवर जावा तशी ती अनुभूती. आणि हे देवा, तुझ्या उदराने अनेक शरणांगतांचे अपराध पचवले, तसे सर्व सुष्टीचे अपराध पोटात घेऊन एक नवी सकाळ हळुहळु फुलांप्रमाणे उमलत आहे.
रग है, पर राग नही,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूंजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज.
वेदना आहे, दुखणे आहे, पण कोणताच राग नाही. रागाचा अभाव असलेला तो विराग, तोच विश्वास आहे. कोणतीच आसक्ती नाही. आजही घराघरात कृष्ण-बासरीचे गाणं आहे, जगणे मुरली आहे, आणि मरणेही मुरली आहे, असे हे सुंदर भावकाव्य आणि मनोहर संगीत असलेली सकाला काय आनंद असेल. केवळ सुंदर. माणूस आज सुखासाठी धपडपडतांना दिसतो. विवंचना, अडचणी, दु:ख, अशा गोष्टीतून असा एक वेगळा प्रसंग सुखद आनंद देऊन जातो.
‘ऐकूनि विश्व सुखावे ज्या केकीचा अपूर्व तो टाहो,
त्याला आयुष्याचा इशकृपेने कधी ना तोटा हो.
केकावलीच्या टाहोने सर्व जग सुखी व्हावे, हीच त्या चराचर सृष्टीच्या निर्मात्याकडे प्रार्थना……!
टीप : रचना मा.मोदींच्या ट्वीटरवरुन घेतली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा